कोण आहेत छञपती शिवाजी महाराज? काय आहे त्यांची कामगिरी.

 *  छत्रपती शिवाजी महाराज :- 

    महाराष्ट्रातील मराठ्यांच्या राज्याचे संस्थापक आणि मराठी पहिले अभिषिक्त छत्रपती. मालोजीराजे पुत्र  शहाजी आणि  सिंदखेडकर राजे लखुजी जाधवांची मुलगी जिजाऊ या दांपत्याच्या पोटी  फाल्गुन वद्य  तृतीया शके १५५१ म्हणजे  इ.स. १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्यावर एक बाळ जन्मास आले ते म्हणजे  छत्रपती शिवाजी महाराज होय. मालोजी हे वेरुळच्या घराण्यातील पहिले कर्तबगार पुरुष. मालोजीराजे व विठोजीराजे ही वेरुळचे पाटील बाबाजीराजे भोसल्यांचे मुल होत. मालोजी हे निजामशाहीतील कर्तबगार सरदार होते. यांना पुणे ,सुपे हे विभाग त्याना देण्यात आले होते.  मालोजीराजे व उमाबाई  यांना शहाजी व शरीफजी असे ही दोन मुले होती. शहाजीराजे हे पाच वर्षाचे असताना मालोजीराजे यांचा मृत्यू झाला.

छत्रपती शिवाजी महाराज

     मालोजीनंतर शहाजीराजे यांना जहागिरदारी देण्यात आली.आदिलशाही व मुघल बादशाह यांच्याकडून निजामशाहीविरुद्ध चालून आले.याला विरोध म्हणून आदिलशाहीविरुद्ध शहाजीराजे व मलिक अंबर हे खूप निकराणे लढल या लढाईत आदिलशाहीचा पराभव झाला. परंतु या लढाईत शरीफजी मारले गेले.ही प्रसिध्द  लढाई भातवडी लढाई म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु या विजयाने निजमशाहाच्या दरबारात शहाजीराजे यांची वाहवाही झाली. या वाहवाही ने खुद्द मलिक अंबर हा शहाजी विरुद्ध झाला. या कारणामुळे शहाजीराजे यांना निजामशाही सोडली व आदिलशाहीस येऊन मिळाले. आदिलशाहाने शहाजीराजे यांना 'सरलष्कर'हा किताब दिला.परंतु काही दिवसानंतर पुनः शहाजीराजे निजामशाहीस जाऊन मिळाले.  

     छत्रपती शिवरायांनी आपल्या सवंगळी सोबत मिळून रायरेश्वरच्या देवालयांत स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. त्यांनी स्वराज्याची मुहूर्तमेळ तोरणा किल्ला जिंकून रोवली. महाराजानी मुरुंबदेव या किल्याची पुनःबांधणी करून त्याला राजगड हे नाव दिले. नंतर हीच स्वराज्याची पहिली राजधानी झाली.  इ.स. १६५६ ला आदिलशहाचा सरदार जावळीचे चंद्रराव मोरेचा पराभव केला. जावळी जवळच पन्हाळगड हा किल्ला बांधला.

अफझलखानाशी लढा :-

    शिवाजी महाराजांनी केलेल्या नुकसानामुळे विजापूरचा सल्तनत नाराजी होती. मुघलांशी शांतता करार केल्यानंतर आणि तरुण आली आदिल शाह दुसरा सुलतान म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकारल्यानंतर, विजापूरचे सरकार अधिक स्थिर झाले आणि त्यांचे लक्ष शिवाजी महाराज कडे वळले.१६५७ मध्ये सुलतानाने किंवा त्याच्या बहुदा  आई आणि कारभारी हिने,अफझलखान या अनुभवी शेनापतीला शिवाजी महाराजांना अटक करण्यास पाठवले.

अफझलखान लढा 
              अफझलखान मोठा फौजफाठा घेऊन विजापूरहून जून १६५९ ला   निघाला. खान येत आहे ही बातमी ऐकताच शिवाजी महाराजांनी आपला   मुक्काम रायगडावरून घनदाट जंगलातील दुर्गम भागात असलेल्या प्रापगड येथे हलवला. अफझलखानाने तुळजापूरच्या भवानी मंदिराचा उध्वंस केला व आपली नजर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरावर वळवली. खानाचा असा अंदाज होता की मंदिरे अश्या प्रकारे उध्वस्त केली तर शिवाजी चिडून उघड्यावर येऊन युद्ध करतील परंतु शिवाजी महाराजांनी अजूनच बचावाचा पावित्रा घेतला. खानाने आपला मुक्काम वाई येथे टाकला.तो पूर्वी वाईचा सुभेदार असल्याने त्याला त्या भागांची चांगलीच माहिती होती.

 छत्रपती शिवाजी महाराजांनी दूत पाठवून  खानाला आपण घाबरले असल्याचे दाखवले व आपल्याला खानशी युध्द करायचे नाही व समझोत्यास तयार आहोत हे कळवले.शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला यावे असे कळवले व खानाने पायथ्याशी भेटण्यास तयार झाला. भेटी दरम्यान दोन्ही पक्ष कोणतेही हत्यार वापरणार नाही असे ठरले. प्रत्येक पक्षाचे १० रक्षक असतील व त्यातील एक शामियानाबाहेर थांबेल. इतर अंगरक्षक दूर राहतील असे ठरले. भेटीची वेळ इ.स.१० नोव्हेंबर १६५९ रोजी ठरली.
     भेटीच्या दिवशी अफझलखान भेतेच्या वेळेच्या आधीच शामियानात आला. शिवाजीने जाणून बुजून अलिशान भव्य शामियाना बनवला होता. निशस्त्र भेटायचे ठरले असतानाही खानने अंगरख्याखाली बिचवा लपवला होता व खानकडून घातपाताची शक्यता शिवाजी महाराजांनी १०० टक्के धरली होती त्यामुळे त्यांनी अंगरख्याखाली चिलखत चढवला होता व लपवण्यास अतिशय सोपी असी वाघनखे हातामध्ये लपवली होती.भेटीच्या सुरवातीच खानाने शिवाजी महाराजांना अलिंगन देण्यास बोलावले व उंच अफझलखानाने शिवाजीनां काखेत दाबून बिचव्याचा वर केला. परंतु चिलखत असल्याने महाराज बचावले.खानाने दगा केलेला पाहून शिवाजी महाराजांनी लपवलेली वाघनखे काढली व खानाच्या पोटाच घुसवली .खानाने आक्रोश केला व अंगरक्षक सावध झाले .सय्यद बंडा णे शिवाजी महाराजांवर वार केला परंतु तो वार जीवा महालाने आपल्यावर घेतला व शिवाजी महाराज बचावले. म्हणून ‘जीव होता म्हणून वाचला शिवा’ हि म्हण रूढ झाली.

*  शाहिस्तेखान फजीती :-
 आता मुघल सम्राट झालेल्या औरंगजेबाने विजापूरच्या बडी बेगमच्या विनंतीवरून जानेवारी १६६० मध्ये त्याचा मामा शाहिस्तेखान याला शिवाजी महाराजांवर हल्ला करण्यासाठी १,५०,००० हून अधिक सैन्यासह शक्तिशाली तोफखाना देऊन पाठवले. खानासोबत सिद्दी जौहरच्या नेतृत्वाखालील विजापूरचे सैन्य देखील होते. शाहिस्तेखान आपल्या ८०,००० इतक्या सुसज्ज सैन्यासह पुणे ताब्यात घेतले. त्याने जवळचा चाकणचा किल्लाही घेतला. किल्ल्याच्या भिंतीला तडे जाण्यापूर्वी दीड महिना त्याला वेढा घातला होता. शाहिस्तेखानाने मोठे, चांगल्या तरतुदीचे आणि जोरदार सशस्त्र मुघल सैन्याचा फायदा घेऊन काही मराठा प्रदेशांत घुसखोरी केली. त्याने पुणे शहरही ताब्यात घेतले आणि लाल महालातील शिवाजी महाराजांच्या राजवाड्याला आपले निवासस्थान बनवले.

शाहिस्तेखान फजिती  

     ५ अप्रिल १६६३ च्या रात्री शिवरायांनी शाहिस्तेखानच्या छावणीवर रात्रीचा धाडशी हल्ला केला. लाल महालाजवळून जाणाऱ्या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन ४०० माणसांसह शिवाजी महारज लाल महालात शिरले. महालाच्या कानाकोपरा माहिती असल्यामुळे लवकरच शिवाजी महाराज प्रत्यक्ष साहिस्तेखानाच्या शयनगृहात घुसले. तोपर्यंत महालात कोठेतरी झटापट सुरु झाल्यामुळे शाहिस्तेखानला जाग आली आणि शिवरायांना समोर पाहून खानाने जीव वाचवण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली. शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतन्याएवजी त्याची तीन बोटे कापली गेली. हा हल्यात शाहिस्तेखान चा मुलगा, त्याच्या अनेक बायका, नौकर आणि सैनिक मारले गेले. खानाने पुण्याच्या बाहेर मुघल सैन्याचा आश्रय घेतला. या लाजिरवाण्या पराभवाची शिक्षा म्हणून औरंगजेबाने शाहिस्तेखानाची बदली बंगालमध्ये केली.

सुरतेची पहिली लुट :-

     इ.स. १६६४ सततची युद्धे आणि त्यामुळे रिता होत असलेला खजिना यामळे शिवाजीराजे चिंतेत असत. मुघलांना किंवा इतर सुलतानांना ही चिंता फार सतावीत नसे.अन्याय कर लादून किंवा बळजबरीने खंडणी जनतेकडून वसूल करण्यात  कारभारास कमीपणा वाटत नव्हता. अनेक दिवसांच्या खलबतानंतर शिवाजीराजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला तो म्हणजे इतिहासाला माहीत असलेली सुरतेची पहिली लुट होय. आजच्या गुजरात राज्यातील सुरत शहर हे तत्कालीन मुघल राज्यात होते आणि व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरामध्ये गणले जाते. सुरत शहराच्या लुटीमुळे दोन गोष्टी साध्य करता आल्या ,एक म्हणजे मुघल सत्तेला आव्हान आणि राज्याच्या खजिन्यात भर.  

      लुटीचा इतिहास भारतामध्ये अतिशय रक्तरंजित आणि विनाशक आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरतेची लुट हि पूर्णपणे वेगळी जाणवते. शिवाजीराजांच्या आज्ञेनुसार स्त्रिया, मुले आणि वृध्द यांच्या केसालाही धक्का न लावता ही लुट केली गेली. मशिदी, चर्च यांसारख्या देवस्थानानाही लुटीतून संरक्षण दिले.

* पन्हाळ्याचा वेढा :-

विजापूर सैन्याचा पराभव करून शिवाजी महाराजांच्या सैन्याने कोकण आणि कोल्हापूरकडे कूच करून पन्हाळा किल्ला ताब्यात घेतला आणि १६५९ मध्ये रुस्तम जमान आणि फझलखान यांच्या नेतृत्वाखाली पाठवलेल्या विजापुरी सैन्याचा पराभव केला. मुघलांशी युती करून १६६० मध्ये आदिलशहाने आपला सेनापती सिद्दी जौहरला पाठवले. उत्तरेकडून मुघल सेना आक्रमण करणार होती तर दक्षिण सीमेवर सिद्दी जौहर हल्ला करणार होता. त्यावेळी शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह पन्हाळा किल्ल्यावर तळ ठोकून होते. १६६० चा मध्यात सिद्दी जौहरच्या सैन्याने पन्हाळ्याला वेढा दिला आणि पुरवठा मार्ग बंद केला.

    पन्हाळ्यावरील गोळीबाराच्या वेळी सिद्दी जौहरने राजापूर येथे इंग्रजाकडून ग्रेनेड खरेदी करून त्याची कार्यक्षमता वाढवली. किल्यावर केलेल्या भडिमारात मदत करण्यासाठी काही इंग्रज तोफखान्याची नेमणूक केली. यावेळी इंग्रजांनी वापरलेला ध्वज सुस्पष्टपणे फडकवला गेला होता. इंग्रजांनी केलेला हा विश्वासघात शिवरायांना समजल्यावर त्यांना राग आला. त्यांनी डिसेंबरमध्ये राजापूर येथील इंग्रजी कारखाना लुटून याची बदला घेतलं आणि चार इंग्रजांना पकडले व त्यांना १६६२ च्या मध्यापर्यंत तुरुंगात ठेवले.अनेक महिन्याच्या वेढ्यानंतर शिवाजी महाराजांनी सिद्दी जौहरशी वाटाघाटी केल्या आणि २२ सप्टेंबर १६६० रोजी विशाळगडावर मगर घेऊन किल्ला ताब्यात दिला.१६७३ मध्ये महाराजांनी पन्हाळा किल्ला परत घेतला.

पावनखिंड लढाई :- 

   रात्रीच्या वेळी पन्हाळ्यातून शिवाजी महाराज निसटले आणि शत्रूच्या घोडदळानी त्याचा पाटलाग केला असता, बांदल देशमुखचे मराठा सरदार बाजीप्रभू देशपांडे हे ३०० सैनिकांसह घोडखिंड येथे शत्रूला रोखण्यासाठी मृत्युपर्यंत लढण्यासाठी स्वेच्छेने उतरले. यामुळे शिवाजी महाराज आणि बाकीच्या सैन्याला विशाळगड किल्लापर्यंत सुरक्षितपणे पोहचण्याची संधी मिळाली.

  पावनखिंड लढाईत लहान मराठा सैन्याने मोठ्या सत्रुला रोखल्यामुळे शिवाजी महाराजांना निसटण्यासाठी वेळ मिळाला. १३ जुलै १६६० रोजी संध्याकाळी बाजीप्रभू देशपांडे जखमी झाले होते तरीही विशाळगडावरून तोफांचा आवाज येई पर्यंत त लढत राहिले. हा तोफेचा आवाज म्हणजे शिवाजी महाराज हे सुरक्षितपणे गडावर पोहोचल्याचा संकेत होता. घोडखिंडीचे नंतर बाजीप्रभू देशपांडे, शिबोशिंग जाधव, फुलोजी आणि तेथे लढलेल्या इतर सर्व सैनिकांच्या सन्मानार्थ पावनखिंड असे नामकरण करण्यांत आले.

* पुरंदर तह :- 

  शाहिस्तेखान आणि सुरातेवरील हल्ल्यामुळे औरंगजेब संतप्त झाला. प्रतिउत्तरादाखल त्याने राजपूत मिर्झाराजे जयसिंग पहिला याला शिवाजी महाराजांचा पराभव करण्यासाठी सुमारे १५००० सैन्यासह पाठवले १६६५ मध्ये जयसिंग सैन्याने शिवाजी महाराजांवर दबाव आणला.जयसिंगच्या घोडदळानी ग्रामीण भाग उध्वस्त केला आणि त्याच्या सैन्याने महाराजांच्या किल्याना वेढे घातले. हा मुघल सेनापती शवाजी महाराजांच्या अनेक प्रमुख सेनापतीना आणि त्यांच्या अनेक घोडदळाना मुघल सेवेत आकर्षित करण्यात यशस्वी झाला. १६६५ च्या मध्यापर्यंत जयसिंगाने पुरंदरच्या किल्याला वेढा घातला आणि किल्ला हातातून जाण्याची वेळ जवळ आल्याने शिवरायांनी करार करणे भाग पडले. या कराराला पुरंदरचा करार किंवा पुरंदरचा तह असे म्हणतात.

   ११ जून १६६५ रोजी शिवाजी महाराज आणि जयसिंग यांच्यात झालेल्या पुरंदरच्या तहात शिवरायांनी २३ किल्ले सोडून देण्याचे कबूल केले, १२ किल्ले स्वतः कडे ठेवले आणि मुघलांना ४०,००० सोन्याचे हुण इतकी भरपाई दिली. शिवरायांनी मुघल साम्राज्याच्या जमीनदार बनण्याचे आणि मुलगा संभाजी यांना ५,००० घोडेस्वारासह दख्खनमध्ये मुघलांशी लढण्याची मनसबदार म्हणून पाठवण्यास सहमती दर्शवली.

आग्रावरून सुटका :- 

   १६६६ मध्ये औरंगजेबाने शिवाजीराजांना त्यांचा नऊ वर्षाचा मुलगा संभाजीसह आग्रा येथे बोलावले. मुघल साम्राज्याचा वायव्य सरहद्दीला मजबूत करण्यासाठी औरंगजेबाने राजांना कंदाहार येथे पाठवण्याची योजना आखली, जो आत्ता अफगाणिस्तानमध्ये आहे. तथापि दरबारात १२ मे १६६६ रोजी शिवरायांना तुलनेने कनिष्ठ सरदारांच्या बरोबर उभे केले गेले. यापैकी काहींना त्यानीं आधीच युद्धात पराभूत केले होते. शिवाजी महाराज या अपमानामुळे दरबारातून निघून गेले. यामुळे त्यांना तातडीने नजरकैदेत ठेवण्यात आले. जयसिंगचा मुलगा रामसिंग याने शिवाजी आणि संभाजी महाराज यांना ताब्यात देण्याची हमी दिली.
    

    शिवाजी महाराजांनी स्वतःला मुक्त  करण्याची योजना आखू लागले.  शिवाजीराजांनी आजारी असल्याचे भासवले.आणि ब्राम्हण आणि गरिबांनी प्रायश्चित म्हणून मिठाईने भरलेले मोठे पेटारे पाठवायला सुरुवात केली. सुरुवातील पहारेकरी प्रत्येक पेटारे बारकाईने तपासून पाहत परंतु काही दिवसांनी यात ढिलाई होऊ लागली. नंतर त्यांनी तपासण्याचे देखील सोडाले.१७ ऑगस्ट १६६६ रोजी शिवाजी महाराज स्वतः मोठ्या पेटाऱ्यात बसले आणि संभाजी दुसऱ्या टोपलीत बसवून निसटले आणि त्यांनी आग्रा सोडले.

*  राज्याभिषेक सोहळा :- 
     स्वराज्यासाठी एक उत्तराधिकारी असणे गरजेचे आहे असे शिवरायांना वाटू लागले.म्हणून तीस वर्षाच्या अथक परिश्रमानंतर राज्याभिषेक करण्याचे ठरवले. राज्याभिषेक वैदिक संस्कारांनी व्हावा असे गागाभट्ट या विद्वानांनी ठरविले आणि राज्याभिषेकाची तारीख ठरली. राज्याभिषेकाचा दिवस उजाडला तो म्हणजे इ.स.६ जून १६७४. हे राज्याभिषेक गागाभट्ट यांच्या हस्ते संपन्न झाला आणि शिवाजी महाराजांच्या स्वरुपात स्वराज्याला एक राजा मिळाला. परंतु हा हर्ष जास्त काळ   झाला नाही कारण काही दिवसातच म्हणजे १७ जून १६७४ ला माता जिजाऊ यांचा मृत्यू झाला. प्राचीन काळात वैदीक आणि तांत्रिक अशा दोन पद्धती अस्तित्वात होत्या म्हणून अल्पावधीतच शिवरायांनी दुसरा राज्याभिषेक करून घेतला. इ.स.२४ सप्टेंबर १६७४ ला निश्चलपुरी गोस्वामी यांच्या हस्ते राज्याभिषेक केला. हा राज्याभिषेक तांत्रिक पद्धतीने करण्यात आले.

 
* शिवाजी महाराज अंतिम पर्व :-

          छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले मराठा होते ज्यांनी स्वराज्याचे म्हणजे स्वतः च्या राज्याचे स्वप्न पहिले होते. शिवाजी महाराज हे आपल्या पन्नास वर्षाच्या कालखंडात खूप अशा लढाया लढल्या आणि आपले स्वराज्य स्थापन केले.शिवाजी महाराजांच्या चरित्रातील सभासद बखरचे लेखक कृष्णाजी अनंत सभासद यांच्या लेखनात शिवाजी महाराजांचे मृत्यूचे कारण ताप असे सांगण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू रायगड किल्यावर इ.स.३ एप्रिल १६८० ला झाले.आणि आपल्या सर्वाना सोडून गेले. मध्ययुगाच्या इतिहासातील सर्वात कर्तबगार असे राजे असे म्हटले जाणारे राजे छत्रपती शिवाजी भोसले होते.  
छत्रपती शिवाजी महाराज समाधी 

     

* शिवाजी महाराज कुटुंब :-  

पत्नी-  

     सईबाई निंबाळकर

     सोयराबाई मोहिते

     काशीबाई जाधव 

       गुणवंतीबाई इंगळे

५     पुतळाबाई पालकर

६     लक्ष्मीबाई विचारे

७    सगुणाबाई शिंदे

८     सकवारबाई गायकवाड

    * मुले -

        संभाजी महाराज

       राजाराम महाराज 

     * मुली -

     अंबिकाबाई महाडीक

     कमळाबाई ( सकवारबाई मुलगी )

       दीपाबाई

     राजकुंवरबाई शिर्के ( सगुणाबाई मुलगी )

     राणूबाई पाटकर

       सखुबाई निंबाळकर ( सईबाईची मुलगी ) 




 


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने