आपल्या पूर्वजांनी अनेक वस्तू आजही अस्तित्वात आहेत. त्यांनी कोरून ठेवलेले विविध लेख आपल्याला सापडले आहेत. या साधनांच्या मदतीने आपल्या इतिहास कळू शकतो. याशिवाय चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य, येतीहासिक कागदपत्रे यांच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो. या सर्वाना ' इतिहासाची साधने'म्हणतात. इतिहासाची साधने तीन प्रकारची आहेत ; भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने.
* भौतिक साधने :-
*लिखित साधने :-
अश्मयुगातील माणसाने त्याच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना चित्रातून व्यक्त केल्या आहेत . हजारो वर्षे उलटल्यानंतरं माणसाला लिहिण्याची कला अवगत झा माणूस सुरुवातीला प्रतीके ,चिन्हे यांचा वापर नोंदी ठेवण्यासाठी करत असे . त्यापासून लिपीचा विकास होण्यास हजारो वर्षे जावी लागली . सुरुवातीच्या काळात खापरे ,कच्च्या विटा , झाडांच्या साली , भूर्जपत्रे यांसारख्या साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग केला जाई अशा प्रकारच्या साहित्यावरील मजकूर एखादया अणकुचीदार साधनाने कोरलेला असे . अनुभव व ज्ञान जसजसे वाढत गेले तसतसे त्याने विविध पद्धतीनी लेखन करण्यास सुरुवात केली .सभोवताली घडलेल्या घटना ,दरबारी कामकाजाचे वृत्तांत इत्यादी माहिती लिहून ठेवण्याची पद्धत सुरु झाली .अनेक राजांनीआपल्या आज्ञा,निवाडे ,दानपत्रे दगडांवर किंवा तांब्याच्या पत्र्यावर कोरून ठेवली आहेत .कालांतराने वाड्मयाचे अनेक प्रकार निर्मान झाले धार्मिक -सामाजिक स्वरूपाने ग्रंथ ,नाटके काव्ये ,प्रवासवर्णन तसेच शास्त्रीय विषयांवरील लेखन झाले .या साहित्यातून त्या त्या काळाचा इतिहास समजण्यास मदत होते. या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात.
* मौखीक साधने :-
ओव्या, लोकगीते,लोककथा यांसारखे साहित्य लिहून ठेवलेले नसते. त्याचा कर्ता अज्ञात असतो. ते पिढ्यानपिढ्या जतन झालेले असते.अशा साहित्याला मौखीक परंपरेने जतन झालेले साहित्य असे म्हणतात. ओव्या, लोकगीते, लोककला यांसारखे लोकसाहीत्याचे प्रकार याच्या त्यात समावेश होतो.अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची 'मौखिक साधने' म्हणतात.
* प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने :-
अश्मयुगाच्या कालखंडाच्या इसवी सनाच्या आठव्या शतकापर्यंत कालखंड का भारताच्या इतिहासाचा प्राचीन कालखंड मानला जातो. भारतातील अश्मयुगाविषयी माहिती पुरातत्वीय उत्खननातून मिळते. त्या कळत लिपीचा विकास झाला नव्हता. इ.स.पु. १५०० पासूनच्या प्राचीन इतिहासाविषयीची माहिती वेद वाङमयातून मिळते. सुरुवातीस वेद हे लिखित नव्हते. ते मुखोद्गत करण्याचे तंत्र प्राचीन भारतीयांनी विकसित केले होते. कालांतराने वेदाचे लेखन झाले. वेद वाङमय व त्यानंतर लिहिली गेलेली साहित्य हे प्राचीन भारतीय इतिहासाची एक महत्वाचे साधने आहे. यामध्ये ब्राम्हणग्रंथ,उपनिषदे, आरण्यके,रामायण महाभारत ही महाकाव्ये, जैन व बौद्ध ग्रंथ,नाटक, काव्ये,शिलालेख, स्तंभलेख, परकीय प्रवाशांची प्रवासवर्णने इत्यादींचा समावेश होतो. त्याचप्रमाणे पुरात्वीय उत्खननातून सापडलेल्या वस्तू,पुरातन वास्तू, नाणी अशा अनेक भौतिक साधनांच्या मदतीने आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास समजतो.