इतर धर्म

  * ज्यू धर्म :- 

      ज्यू धर्माचे लोक साधारणपणे इसवी सनाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकात केरळमधील कोची येथे आले असावेत. ज्यू धर्माला  'यहुदी' धर्म असेही म्हणतात.डे एकच आहे, असे ज्यू धर्मीय मानतात. ज्यू धर्माच्या शिकवणीत न्याय,सत्य,शांती, प्रेम, करुणा, विनम्रता,दान करणे, चांगले बोलणे  आणि स्वाभिमान या गुणांवर भर दिलेला आहे. त्याच्या प्रार्थनास्थळाला सिनेगॉग असे म्हणतात.

ज्यू धर्माचे प्रार्थनास्थळ

* ख्रिश्चन धर्म :- 

        ख्रिश्चन  धर्माची स्थापना येशू  ख्रीस्तांनी केली.  तो सर्व जगभर पसरला आहे, येशू ख्रिस्तांच्या १२ शिष्यांपैकी एक असणारे सेंट  थॉमस हे इसवी संचय पहिल्या शतकात केरळमध्ये आले. त्यांनी त्रीचूर  जिल्ह्यातील पल्लयुर येथे इसवी सन ५२ मध्ये चर्चची स्थापना केली. ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीनुसार देव एकच आहे. तो सर्वाचा प्रेमळ पिता आहे आणि सर्व शक्तिमान आहे. येशू ख्रिस्त हे देवाचे पुत्र असून मानवजातीच्या उद्धारासाठी पृथ्वीवर आलेले होते असे ते मानले जाते. आपण सारे एकमेकांचे बंधुभगिनी आहोत. आपण सर्वांवर प्रेम केले पाहिजे, अगदी शत्रूवर देखील, असे ख्रिश्चन धर्मामध्ये सांगितले आहे. बायबल हा ख्रिश्चन धर्माचा पवित्र धर्मग्रंथ आहे. ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थनास्थळाला 'चर्च' असे म्हणतात. 


ख्रिश्चन धर्माचे प्रार्थनास्थळ 

* इस्लाम धर्म :-

        इस्लाम हा एकेश्वरवाद मानणारा धर्म आहे. अल्ला एकच असून मुहम्मद पैगंबर त्यांचे प्रेषित आहेत. ईश्वराचा संदेश पैगंबरमार्फत पवित्र कुरआन या धर्मग्रंथातून प्रकट झालेला आहे. इस्लाम या शब्दाचा अर्थ 'शांती' असा आहे. या शब्दाचा अर्थ 'अल्लाहला शरण जाणे' asahi होतो. सर्वकाळी आणि सर्वत्र फक्त अल्लाह आहे, तो सर्वशक्तिमान आणि परम दयाळू आहे,असे इस्लाममध्ये सांगितलेले आहे. मानवी अस्तित्वाचा हेतु अल्लाहची उपासना करणे हाच आहे, असे मानलेले आहे. मनुष्याने आयुष्यात कसे वागावे,याचे मार्गदर्शन पवित्र 'कुरआन' या धर्मग्रंथात केलेले आहे. भारत आणि अरबस्तान यांमध्ये फार प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते. अरबस्तानातील व्यापारी केरळच्या किनाऱ्यावर बंदरांना भेट देत असत. इसवी सनाच्या सातव्या शतकात अरबी व्यापऱ्यामार्फत भारतामध्ये इस्लामचा आगमन झाले. इस्लाम धर्माच्या प्रार्थनास्थळाला 'मशीद' असे म्हणतात.

इस्लाम धर्माचे प्रार्थनास्थळ 

* पारशी धर्म :-    

          पारशी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध होते. पारशी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव 'अवेस्ता' असे आहे. ऋग्वेद आणि अवेस्ता यांतील भाषेमध्ये साम्य आहे. पारशी लोक इराणच्या 'पार्स'किंवा  'फार्स' नावाच्या प्रांतातून भारतात आले, म्हणून त्यांना 'पारशी' या नावाने ओळखले जाते. ते प्रथम गुजरातमध्ये आले. ते इसवी सनाच्या आठव्या शतकात आले असावेत असे काहींचे मत आहे. झरथूष्ट्र हे पारशी धर्माचे संस्थापक होते. 'अहुर मज्द' या नावाने त्यांच्या देवांचे उल्लेख केला जातो. पारशी धर्मामध्ये अग्नी आणि पाणी या दोन तत्वांना अत्यंत महत्व आहे.त्यांच्या देवळांमध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो.त्या देवळांना अग्यारी असे म्हणतात.उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती हि तीन प्रमुख आचरणतत्वे हा पारशी विचारसरणीचा गाभा आहे. 


पारशी धर्माचे धर्मस्थळ 














 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने