* बौद्ध धर्म :-
बौद्ध धर्माचा प्रसार भारत आणि भारताबाहेरील अनेक देशांत झाला.गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते.
गौतम बुद्ध यांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी वनात झाला.त्यांच्या पित्याचे नाव होते शुद्धोदन आणि आईचे नाव होते मायादेवी. गौतम बुद्धांचे मुला नाव शिद्धार्थ होते. त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते, म्हणून त्यानं बुद्ध असे म्हटले गेले.मानवी जीवनात दुःख का आहे,हा प्रश्न त्यांना पडला. त्याचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी घरादाराचा त्याग केला.एका वैशाख पौर्णिमेला बिहारमधील गया शहरापासून जवळच असलेल्या उरुवेला या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली ते ध्यानस्थ बसले होते.त्या वेळी त्यांना बोधि प्राप्त झाली.'बोधि म्हणजे सर्वोच्च ज्ञान'. त्या पिंपळाच्या वृक्षाला आता 'बोधिवृक्ष' आहे म्हणतात.
तसेच उरुवेला या ठिकाणाला 'बोधगया' असे म्हटले जाते.त्यांनी त्यांचे पहिले प्रवचन वारानसीजवळ 'सारनाथ' येथे दिले. या प्रवचनात त्यांनी जो उपदेश केला, त्यास धम्म असे म्हटले जाते. या प्रवचनाद्वारे त्यांनी धम्माच्या चक्राला गती दिली म्हणून या घटनेला 'धम्मचक्कपवत्तन' असे पाली भाषेत म्हटले जाते. संस्कृतमध्ये त्याला 'धर्मचक्रप्रवर्तन' असे म्हटले जाते . नंतरच्या काळात त्यांनी धम्माचा उपदेश करण्यासाठी सुमारे पंचेचाळीस वर्षे चारिका केली.'चारिका म्हणजे पायी फिरणे'. त्यांनी आपला उपदेश पाली या लोकभाषेत केला.बौद्ध धाम्मामध्ये बुद्ध,धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना महत्वाची आहे. त्यांनी सांगितलेला 'त्रीशरण' असे म्हटले जाते. त्यांनी सांगितलेल्या धम्माचे सार पुढीलप्रमाणे आहे.
आर्यसत्ये :- मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी चार सत्ये आहेत.त्यांना आर्यसत्ये म्हटलेले आहे.
१. दुःख :- मानवी जीवनात दुःख असते.
२. दुखाःचे कारण :- दुखाःला कारण असते.
३. दुःख निवारण :- दुःख दूर करता येतो.
४. प्रतिपद :- प्रतिपद म्हणजे मार्ग.
हा दुःखांचा अंत करण्याचा मार्ग आहे. मार्ग शुद्ध आचरणाचा आहे. या मार्गाला 'अष्टांगिक मार्ग' असे म्हटले जाते.
पंचशील :- गौतम बुद्धांनी पाच नियमाचे पालन करण्यास सांगितले. त्या नियमांनाच 'पंचशील' असे म्हणतात.
१. प्राण्याची हत्या करण्यापासून दूर राहणे.
२. चोरी करण्यापासून दूर राहणे.
३. अनैतिक आचरणापासून दूर राहणे.
४. असत्य बोलण्यापासून दूर राहणे.
५. मादक पदार्थाच्या सेवनापासून दूर राहणे.
अष्टांगिक मार्ग :-
१. सम्यक् दृष्टी - चार आर्यसत्यांचे ज्ञान होय.
२.सम्यक् संकल्प - हिंसा वगैरे तत्वांचा त्याग करणे.
३. सम्यक् वाचा - असत्य, चहाडी,कठोरता आणि निरर्थक बडबड न करणे.
४. सम्यक् कर्मांत - प्राण्यांची हत्या,चोरी आणि स्वैराचार यांच्यापासून दूर राहणे.
५.सम्यक् आजीव -उपजीविका गैर मार्गाने न करता योग्य मार्गाने करणे.
६. सम्यक् व्यायाम - व्यायाम म्हणजे प्रयत्न करणे होय.
७. सम्यक् स्मृती - मन एकाग्र करणन लोभ वगैरे विकाराना दूर करणे आणि आपले चित्त वैगैरे योग्य रीतीने समजून घेणे.
८. सम्यक् समाधी - चित्त एकाग्र करून ध्यानाचा अनुभव घेणे.
बौद्ध संघ :-
आपल्या धम्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी भिक्खुंचा संघ निर्माण केला. गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्या त्यांच्या अनुयायांना 'भिक्खू' असे म्हटले जाई. बुद्धाप्रमाणे भिक्खूही चारिका करून लोकांना धम्माचा उपदेश करत असत.स्त्रियांचा स्वतंत्र संघ होता.त्यांना 'भिक्खूंनी' असे म्हणतात.बौद्ध धर्मात सर्व वर्णातील आणि जातीतील लोकांना प्रवेश होता.
उपदेशाचा सार :-
गौतम बुद्धांनी मानवी बुद्धीच्या स्वातंत्राची घोषणा केली.वर्ण वगैरेंच्या आधारे मानली जाणारी विषमता नाकारली. जन्माने कोणी श्रेष्ठ आणि कनिष्ठ ठरत नाही, तर आचरणावरून श्रेष्ठ कनिष्ठता ठरते.छोटीशी चीमनिदेखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चीवचीवते,हे त्यांचे वचन विख्यात आहे. हे स्वतंत्र आणि समता या मूल्यांविषयीचे त्यांचे चिंतन दर्शवते.त्यांनी पुरुषाप्रमाणे स्त्रियांनाही स्वतःची उन्नती करण्याचा अधिकार आहे असा उपदेश केला. यज्ञासारखा कर्मकांडाला विरोध केला.त्यांनी उपदेशलेली प्रज्ञा,शील,इत्यादी मुल्ये मानवाने कल्याण साधणारी आहेत.सर्व प्राणीमात्राविषयीची करुणा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण वैशिष्ठे होते.गौतम बोद्धानी उपदेशलेली सहिष्णुता केवळ भारतीय समाजालाच नव्हे, तर सर्व मानवजातीला आजही मार्गदर्शक आहे.
लोकायत :-
लोकायत किंवा चार्वाक या नावाने ओळखला जाणारा प्राचीन काळातील विचारप्रवाहही महत्वाचा आहे. त्याचा भर स्वतंत्र विचारावर होता.त्यांनी वेदांचे प्रामाण्य नाकारले. प्राचीन काळात भारतीय भूमीत नवनवीन धार्मिक विचारांचे स्त्रोत निर्माण होत राहिले. कालांतराने ज्यू,ख्रिश्चन,इस्लाम आणि पारशी हे धर्म भारतीय समाजात रुजले.