वेदकाळाच्या शेवटी यज्ञविधींमध्ये बारीकसारीक तपशिलांना नको एवढे महत्व आले.त्या तपशिलांचे ज्ञान फक्त पुरोहित वर्गालाच होते. इतरांना ते मिळवण्याची मोकळीक राहिली नाही. वर्णव्यवस्थेचे निर्बंध अत्यंत कडक होत गेले. माणसांच्या कर्तृत्वापेक्षा त्याच्या जन्म कोणत्या वर्णात झाला,यावर त्यांचे समाजातील स्थान ठरू लागले.त्यामुळेच उपनिषदांच्या काळापासून धर्माचा विचार यज्ञविधीपुरता मर्यादित न ठेवता तो अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न सुरु झाल्याचे दिसते.परंतु उपनिषदांमधील विचार आत्म्याचे अस्तित्व, आत्माचे स्वरूप यांवर भर देणारा होता. सर्वसामान्यांना समजायला अवघड जात होता.त्यामुळे विशिष्ठ देवतांच्या उपासनेवर भर देणारे भक्तिपंथ निर्माण झाले. जसे, शिवभक्तांचा सैवपंथ आणि विष्णुभक्तांचा वैष्णवपंथ. या देवतांच्या संदर्भात वेगवेगळी पुराणे लिहिली गेली.
![]() |
वर्धमान महावीर |
इ.स.पूर्व सहाव्या शतकांच्या सर्वसाधारण मनुष्याला सहज कळेल असा धर्माचा विचार मांडण्याचा प्रयत्न करणारे विचारप्रवाह निर्माण झाले. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या उन्नतीचा मार्ग शोधण्याचे स्वतंत्र आहे,याची जाणीव अनेकांना झाली. त्यातून अनेक धर्म प्रस्थापित झाले.व्यक्तीच्या उन्नतीसाठी जातीपातीचा भेदभाव महत्वाचा नसतो,हे या धर्मानी ठळकपणे मांडले.त्यांनी शुद्ध आचरणाचे महत्व लोकांना मनावर ठसवले. नवीन विचारांच्या प्रवर्तकामध्ये वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचे कार्य विशेष महत्वाचे आहे.
* जैन धर्म :-
जैन धर्म भारतातील प्राचीन धर्मांपैकी एक धर्म आहे. या धर्मात अहिंसा या तत्वाला महत्व दिले आहे.धर्मज्ञान प्रकट करणाऱ्यास जैन धर्मास तीर्थकर म्हणतात. जैन परंपरेनुसार सांगितल्याप्रमाणे एकूण २४ तीर्थकर होऊन गेले.वर्धमान महावीर जैन धर्माच्या परंपरेनुसार चोविसावे तीर्थकर होते.ऋषभनाथ यांना जैन धर्माचे पहिले तीर्थकर मानतात.शेवटचे दोन तीर्थकर,तेविसावे तीर्थकर पार्श्वनाथ (इ.स.पूर्व.९वे -८वे शतक) आणि चोविसावे तीर्थकर महावीर वर्धमान महावीर ( इ.स.पु.५९९ -इ.स.पु.५२७)या ऐतिहासिक व्यक्ती आहेत.वर्धमान महावीर गौतम बुद्धाचे समकालीन होते.
जैन भिक्षु पाच मुख्य व्रत घेतात; अहिंसा,सत्य,अस्तेय( चोरी न करणे), ब्रम्हचर्य( पवित्रता) आणि अपरिग्रह या तत्वाचा जैन संस्कृतीवर अनेक प्रकारे परिणाम झाला आहे. जैन धर्म हा आजही पाळल्या जाणाऱ्या प्राचीन धर्मापैकी एक आहे.यात दोन प्राचीन उप-परंपरा आहेत, दिगंबर आणि श्वेतांबर ज्या तपस्वी प्रथा, लिंग आणि विहित मानल्या जाणाऱ्या ग्रंथाबद्दल भिन्न मते मांडतात. दोन्ही उप- परंपरेत सामान्य लोक द्वारे समर्पित वेदक आहेत.श्वेतांबर परंपरेत दोन उप- परंपरा आहेत्त.डेरावासी ज्यांना मंदिरमार्गी आणि स्थानिकवासी असेही म्हणतात.
* वर्धमान महावीर :-
आज ज्या राज्याला आपण बिहार या नावाने ओलाळत, त्या राज्यामध्ये प्राचीन काळी वृज्जी नावाचे एक महाजनपद होते.त्याची राजधानी होती वैशाली.वैशाली नगराचा एक भाग असलेल्या कुंडग्राम येथे इ.स.पूर्व.५९९ ला वर्धमान महावीर यांचा जन्म झाला.त्यांच्या पित्याचे नाव सिद्धार्थ आणि आईचे नाव त्रिशला होते.
वर्धमान महावीर |
ज्ञानप्राप्तीनंतर लोकांना धर्म समजावून सांगण्यासाठी त्यांनी सुमारे तीस वर्षे उपदेश केला.लोकांना धर्म सहजपणे कळावा म्हणून वर्धमान महावीर अर्धमागधी या लोकभाषेत लोकांशी संवाद साधत.त्यांनी सांगितलेला धर्म हा सुध्द आचरणावर भर देणारा होता.शुध्द आचरणासाठी त्यांनी सांगितलेले मार्गाचा सर पंचमहाव्रते आणि त्रीरत्ने यांमध्ये सामावलेला आहे. लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थकरांच्या ज्या सभा होत,त्यान समवसरण असे अर्धमागधी भाषेत म्हणत असत, हे समवसरणसमतेवर आधारलेले असे.या समवसरणामध्ये सर्व वर्णातील लोकांचा प्रवेश असे.
* पंचमहाव्रते :- पंचमहाव्रते म्हणजे अत्यंत काटेकोरपणे पाळण्याचे नियम.
१) अहिंसा - कोणत्याही जीवाला दुखापत होईल किंवा त्यांची हिंसा होईल, असे कृत्य न करणे.
२)सत्य - प्रत्येक वचन आणि कृती खरेपणाची असावी.
३) अस्तेय - स्तेय म्हणजे चोरी. दुसऱ्याच्या मालकीची किंवा हक्काची गोष्ट मालकाच्या संमतीशिवाय घेणे म्हणजे चोरी.चोरी न करणे म्हणजे अस्तेय.
४) अपरिग्रह - मनात हाव बाळगून मालमत्तेचा साठा करण्याकडे कला असतो. असा साठा न करणे म्हणजे अपरिग्रह.
५) ब्रम्हचर्य - शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टीचा त्याग करून व्रतांचे पालन करणे म्हणजे ब्रम्हचर्य.
* त्रीरत्ने ;- त्रीरत्ने म्हणजे १.सम्यक् दर्शन. २. सम्यक् ज्ञान. ३. सम्यक् चरित्र. हि तीन तत्वे. सम्यक् याचा अर्थ संतुलित असा होतो.
१) सम्यक् दर्शन - तीर्थकारांच्या उपदेशातील सत्य जाणून घेऊन त्यावर श्रध्दा ठेवणे.
२) सम्यक् ज्ञान - तीर्थकारांच्या उपदेशांचा आणि तत्वज्ञानाचा नित्य अभ्यास करून, त्याचा सखोल अर्थ समजून घेणे.
३) सम्यक् चरित्र - पंचमहाव्रतांचे काटेकोर आचरण करणे.
* उपदेशाचा सार :-
महावीरांच्या उपदेशातील अनेकांतवाद म्हटला जाणारा सिद्धांत सत्याच्या शोधासाठी फार महत्वाचा मानला जातो. अनेकांत या शब्दातील अंत या शब्दाचा पैलू असा आहे. सत्याचा शोध घेताना विषयाच्या केवळ एखाददुसऱ्या पैलूवर लक्ष देऊन निष्कर्ष काढल्यास सत्याचा पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. म्हणू त्या विषयाच्या अनेक पैलूंकडे लक्ष देणे आवश्यक असते, असे या शिद्धांतात म्हटले आहे. या सिद्धांतामुळे समाजामध्ये स्वतःच्या मतांविषयी दुराग्रह धरण्याची वृत्ती राहत नाही. इतरांच्या मतांविषयी सहिष्णुता निर्माण होते.
मनुष्याचा मोठेपणा त्यांच्या वर्णावर अवलंबून नसून त्याच्या उत्तम चारित्र्यावर अवलंबून असतो, अशी वर्धमान महावीरांची शिकवण होती. स्त्रियांनी ज्ञान मिळवण्याचे मार्ग वैदिक परंपरेमध्ये हळूहळू बंद झाले होते..मात्र वर्धमान महावीरांनी स्त्रीयानाही सन्यास घेण्याचा अधिकार दिला होता. सर्व प्राणीमात्रावर प्रेम करा, मनामध्ये इतरांबद्दल दया आणि करुणा असू द्या, जगा आणि जगू द्या, असा उपदेश त्यांनी केला.