* वैदिक वाङमय:-
वेद वाङमयावर आधारलेली संस्कृती म्हणजे 'वैदिक संस्कृती' होय. वेद हे सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते. वेदांची निर्मिती अनेक ऋषिणी मिळून केली. वेदांतील काही सुक्ते स्त्रियांनी स्पुरलेली आहेत. वैदिक वाङमयाची भाषा संस्कृत होती. वैदिक वाङमय अत्यंत समृध्द आहे.'ऋग्वेद' हा त्यातील मूळ ग्रंथ मानला जातो.तो काव्यरूप आहे. ऋग्वेदासह यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे चार वेद आहे. या चार वेदांच्या ग्रंथाना 'संहिता' म्हणतात. 'विद्' म्हणजे जाणणे.त्यापासून वेद ही संज्ञा तयार झाली आहे.तिचा अर्थ ज्ञान असा होतो, मौखिक पठणाच्या आधारे वेदांचे जतन केले गेले.वेदांना 'श्रुति' असेही म्हणतात.
- वेद हे अपौरुषीय मानले जाते. वैदिक संस्कृतीचे दोन भाग आहेत -
१) पूर्व वैदिक किंवा ऋग्वेदिक काळ - इ.स.पु. १५०० ते इ.स.पु.१०००
२) उत्तर वैदिक काळ - इ.स.पु. १००० ते. इ.स.पु.६००.
* ऋग्वेद संहिता :-
ऋचांनी बनलेला वेद म्हणजे 'ऋग्वेद' होय. 'ऋचा' म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य. अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी काव्याला 'सुक्त' असे म्हणतात. ऋग्वेद संहितेची विविध देवतांची स्तुती करणारी सूक्ते आहेत. ऋग्वेदामध्ये १० मंडले आहेत.ऋग्वेदाची रचना सुमारे ३५०० वर्षापूर्वी झाली होती.
* यजुर्वेद संहिता :-
यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत.यज्ञविधीमध्ये कोणत्या मंत्राचे पठण केव्हा आणि कसे करावे यांचे मार्गदर्शन या संहितेत आहे. पद्यात आणि गद्यात दिलेले त्या मंत्राचे स्पष्टीकरण अशी या संहितेची रचना आहे.
* सामवेद संहिता :-
काही यज्ञविधीच्या वेळी तालासुरात मंत्रगायन केले जाई. ते कसे गायन करावे, यांचे मार्गदर्शन सामवेद संहितेत केले आहे. भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे.वेदमंत्र गायनाचे एकूण ३६ प्रकार आहेत,ते सामवेदात दिलेले आहे.
* अथर्ववेद संहिता :-
अथर्ववेदाच्या संहितेला 'अथर्व ऋषींचे' नाव देण्यात आले आहे. अथर्ववेदात दैनंदिन जिवनातील अनेक गोष्टींना महत्व देण्यात आलेले आढळते. आयुष्याच्या येणाऱ्या संकटावर, दुखण्यावर करावयाचे उपाय त्यात सांगितलेले आहेत.तसेच अनेक औषधी वनस्पतीची माहितीही त्यात दिलेली आहे.राजाने राज्य कसे करावे , याचेही मार्गदर्शन त्यात केलेले आहे. अथर्ववेदास 'ब्रम्हवेद' असेही म्हणतात.
* ब्राह्यणग्रंथ :-
यज्ञविधीमध्ये देवांचा वापर कसा करावा,हे सांगणाऱ्या ग्रंथाना 'ब्राह्यणग्रंथ' म्हणतात.प्रत्येक वेदांचे स्वतंत्र ब्राह्यणग्रंथ ब्राह्यणग्रंथ आहेत.
* आरण्यके :-
अरण्यात जाऊन, एकाग्र चीत्त्ताने केलेले चिंतन आरण्यक ग्रंथामध्ये मांडलेले आहे.यज्ञविधी पार पाडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होउ नये, याची खबरदारी यात घेतलेली दिसते.
* उपनिषदे :-
'उपनिषद' म्हणजे गुरूजवळ बसून मिळवलेले ज्ञान.जन्म - मृत्यूसारख्या घटनांबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात. त्या प्रश्नाची उत्तरे सहज मिळत नाहीत. अशा गहन प्रश्नावर उपनिषदामध्ये चर्चा केलेली आहे.
चार वेद, ब्राह्यणग्रंथ, अरण्यके, आणि उपनिषदे रचण्यास सुमारे पंधराशे वर्षाचा कालावधी जावा लागला.त्या कालावधीत वेदकालीन संस्कृतीत अनेक बदल होत गेले. त्या बदलांचा आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वैदिक वाङमय हे महत्वाचे साधन आहे.
* कुटुंबव्यवस्था :-
वेदकाळात एकत्र कुटुंबपद्धती होती. कुटुंबातील कर्ता पुरुष घराचा प्रमुख म्हणजे 'गृहपती' असे. गृहपतीच्या परिवारास त्यांचे वृध्द मातापिता, त्यांचे लहान भाऊ आणि त्या भावाचा परिवार, त्याची पत्नी आणि मुले, त्यांचा मुलाचा परिवार अशा सर्वांचा समावेश असे. ही कुटुंबव्यवस्था पुरुषप्रधान होती.सुरुवातीच्या काळात लोपामुद्रा,गार्गी,मैत्रेयी अशा काही विद्वान स्त्रियांचा उल्लेख साहित्यात आढळतो.परंतु हळूहळू स्त्रियांवरील बंधने वाढत गेले.त्यांचे कुटुंबातील आणि समाजातील स्थान अधिकाधिक दुय्यम होत गेले.
वेदकाळातील घरे मातीची किंवा कुळाची असत.गावात किंवा वेलींचे जाडसर तट्टे विणून त्यांच्यावर शेण- माती लिंपून तयार केलेली भिंत म्हणजेकुड.या घराच्या जमिनी शेणा- मातीने सारवलेल्या असत.घरासाठी गृह किंवा शाला हे शब्द वापरले जात.वेदकालीन लोकांचा आहारामध्ये गहू,सातू,तांदूळ या तृन्धाण्याच्या समावेश होता.त्यांपासून ते विविध पदार्थ बनवत असत.वैदिक वाङमयात यव,गोधूम,व्रीही यांसारखे शब्द आढळतात.यव म्हणजे सातू.गोधूम म्हणजे गहू.व्रीही म्हणजे तांदूळ.दुध, दही,तूप, लोणी हे पदार्थ त्यांच्या आवडीचे होते.उडीद,मसूर, आणि तीळतसेच मांस या पदार्थाचा ही त्यांच्या आहारात समावेश होता.
वेदकालीन लोक लोकरी आणि सुती वस्त्रे वापरत.'वल्कले' म्हणजे झाडांच्या सालीपासून तयार केलेली वस्त्रेही वापरत.तसेच प्राण्यांच्या कातड्यांचाही उपयोग वस्त्र म्हणून केला जाई.स्त्रिया आणि पुरुष फुलांच्या माळा, विविध प्रकारच्या मण्यांच्या माळा, सोन्याचे दागिने वापरत असत. 'निष्क' नावाचा गळ्यातील दागिना विशेष लोकपिय असावा. त्यांचा उपयोग वस्तूच्या खरेदी- विक्रीसाठीही आहे.गायन, वादन,नृत्य, सोंगट्याचा खेळ,रथांच्या सर्यती आणि शिकार ही त्यांची मनोरंजनाची साधने होती.वीणा, शततंतू,झांजा आणि शंख ही त्यांची प्रमुख वाद्ये होती. डमरू आणि मृदंग ही तालवाद्येही ते वापरत असत.
* आर्थिक आणि सामाजिक जीवन :-
वैदिक काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता. अनेक बैल जुंपलेल्या नांगरट केली जाई. नांगराला लोखंडाचे फाळ बसवत असत.अथर्ववेदात पिकावर पडणारी कीड, पिकाचा विद्वंस करणारे प्राणी त्यावरील उपाय केलेला आढळतो. खात म्हणून शेणाचा उपयोग केला जात असे. वैदिक काळात घोडा,गाय-बैल,कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्व होते.गायींचा विनिमयासाठी उपयोग केला जाई.त्यामुळे गायींना विशेष किंमत होती. इतरांनी गाई चोरून नेऊ नयेत म्हणून विशेष काळजी घेतली जाई. घोडा हा अत्यंत वेगाने पाळणारा प्राणी. त्याला माणसाळवून रथाला जोडण्यात वेदकालीन लोक निष्णात होते.भरीव चाकापेक्षा आऱ्याचे चाक वजनाने हलके असते.घोडा जोडलेले, आऱ्याच्या चाकांचे वेदकालीन रथ अर्थातच खूप वेगवान होते.
त्या काळात शेती आणि पशुपालन यांच्याखेरीज इतर अनेक व्यवसायांचाही विकास झाला होता. व्यावसायिक, कारागीर समाजव्यवस्थेचे महत्वाचे घटक होते. श्रेणी या नावानेब ओळखले जाणारे त्यांचे स्वतंत्र संघ होते.परंतु हळूहळू व्यावसायिक कारागिरांचा दर्जा दुय्यम होत गेला.त्या काळात समाजात ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र असे वर्ण होते. हे वर्ण व्यवसायावरून ठरत. नंतरच्या काळात वर्ण जन्मावरून ठरू लागले.त्यामुळे जाती निर्माण झाल्या. जातीव्यवस्थेमुळे समाजात विषमता निर्माण झाली.
* धर्मसंकल्पना :-
वेदकालीन धर्मसंकल्पना मध्ये निसर्गातील सूर्य, वारा,पाऊस,वीज,वादळे, नद्या यांसारख्या निसर्गातील शक्तींना देवतारूप दिलेले होते.त्या जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आहेत.त्यांना प्रसन्न ठेवण्यादाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत. त्याला हवी असे म्हणत. अशा तऱ्हेने अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याची विधी म्हणजे यज्ञ. सुरुवातीला यज्ञविधीचे स्वरूप साधे होते. पुढे त्यांचे नियम अधिकाधिक कठीण होत गेले. ते कठीण यज्ञविधी पार पाडणाऱ्या पुरोहितांचे महत्व त्यामुळे वाढत गेले. वेदकालीन लोकांनी सृष्टीचे व्यवहार कसे चालतात याचाही विचार केला होता. उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो,पावसाळ्यानंतर हिवाळा. हे नियमित असणारे सृष्टीचक्र आहे. सृष्टीचक्र आणि गतीने फिरणारे जीवनचक्र याला वेदकालीन लोकांनी ऋत असे नाव दिले. प्राणीमात्रांचे जीवन हाही सृष्टीचक्राचाच एक भाग आहे. सृष्टीचक्रात बिघाड झाल्यावर संकटे येतात. तसे होऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. कोणीही सृष्टीचे नियम मोडू नयेत. असे वागणे म्हणजे धर्माप्रमाणे वागणे, असे समजले जाई.
* शासनव्यवस्था :-
वेदकाळात प्रत्येक ग्रामवसाहतीचा एक प्रमुख असे,त्याला 'ग्रामणी' असे म्हणत. अनेक ग्रामवसाहतीचा समूह म्हणजे 'विश्' ,त्याच्या प्रमुखाला 'विश्पती' असे म्हणत. अनेक 'विश्' मिळून 'जन' तयार होत असे, पुढे जन जेव्हा एखाद्या विशिष्ठ प्रदेशात स्थिरावले, तेव्हा त्या प्रदेशाला 'जनपद' असे म्हटले जाई. जन च्या प्रमुखाला 'नृप' किंवा 'राजा' म्हटले जाई. प्रजेचे संरक्षण करणे, कर गोळा करणे आणि उत्तम राज्यकारभार करणे राजाची कर्तव्ये होती.
राज्यकारभार उत्तम रीतीने चालवण्यास साहाय्य करण्यासाठी राजाने अधिकारी नेमलेले असत. 'पुरोहित' आणि 'सेनापती' हे विशेष महत्वाचे अधिकारी होते. करवसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला 'भागदुघ' असे म्हणत.भाग गोळा करणारा,तो 'भागदुघ'. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा, समिती,विदथ, आणि जन अशा चार संस्था होत्या. त्यामध्ये राज्यातील लोक सहभागी होत.'सभा' आणि 'विदथ' या संस्थाच्या कामकाजात स्त्रियांचाही सहभाग असे.राज्यातील जेष्ठ व्यक्तींच्या मंडळास 'सभा' म्हणत.तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस 'समिती' असे म्हणत.समितीमध्ये लोकांचा सहभाग असे.
पुढे वैदिक विचारप्रवाहात 'स्मुती' व 'पुराण' नावाचे वाङमय निर्माण झाले. 'वेद', 'स्मुती', 'पुराणे' , स्थानिक लोकधारणा इत्यादींवर आधारलेला धार्मिक प्रवाह कालांतराने 'हिंदू' या नावाने ओळखले जाऊ लागला .प्राचीन भारतात यज्ञविधी आणि वर्णव्यवस्था यांच्याबाबतीत वैदिक प्रवाहापेक्षा वेगळी भूमिका घेणारे धार्मिक प्रवाह अस्तित्वात होते.